मुख्य सामग्रीवर वगळा

*ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर क्रांतिकारक ठरेल - हर्षवर्धन पाटील*


इंदापूर : 
                   ऊस शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पाणी व खतांची बचत होऊन सुमारे 40 टक्के पर्यंत उत्पादन वाढ तसेच साखर उतारा वाढ होत असल्याचे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. त्यामुळे ऊस शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए. आय.) चा वापर क्रांतिकारक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी (दि. 8) काढले.
            बारामती येथील ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रास हर्षवर्धन पाटील यांनी कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शेतकरी यांचेसह भेट देऊन मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ व बारामती अँग्रीकल्चर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून घेतलेल्या ऊस शेती प्रक्षेत्रास सकाळी भेट दिली. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी या संदर्भातील वार रूमला भेट देऊन या तंत्रज्ञानाने ऊस घेतलेल्या राज्यातील काही शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधला. त्यानंतर दुपारी एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सभागृहामध्ये या संदर्भात झालेल्या परिसंवादात बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी वरील प्रतिपादन केले.
       हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले, देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्रदादा पवार यांनी ए.आय. तंत्रज्ञान वापरून ऊसाचे पिक घेतल्याने कृषी विज्ञान केंद्राचे नाव जगात सर्वदूर पोहोचले आहेत. आता शेतकऱ्यांना ऊस शेती ही ए.आय. तंत्रज्ञानाने करावीच लागेल, त्याशिवाय शेतकरी तग धरू शकणार नाही. या तंत्रज्ञानामुळे कमी उत्पादन खर्चात, ऊस उत्पादनात मोठी वाढ होऊन क्रांती घडणार आहे. 
       ऊस शेतीला या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्षभर पाणी उपलब्ध होण्यासाठी शेत तळे करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेततळे उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार असून, यासंदर्भात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे व संबंधितांशी माझे बोलणे झाले आहे. ऊस शेती मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या वापरा संदर्भात कर्मयोगी व निरा भिमा या कारखान्यांमध्ये नोडल अधिकारी नेमला जाईल, अशी माहितीही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांचा अलीकडे ऊस पिकाच्या सुमारे 12 महिन्याच्या कालावधीतच ऊस तोडणी कडे कल आहे, त्यामुळे पिकाचा या कालावधीत जास्त टनेज व अधिक साखर उतारा वाढीसाठीचे नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या ऊस तज्ञांनी प्रयत्न करावेत, अशी सूचनाही भाषणात हर्षवर्धन पाटील यांनी केली.
      यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निलेश नलवडे यांनी आर्टिफिशियल पद्धतीने ऊस शेतीची माहिती दिली. ऊस शेतीमधील क्रांतीकारक बदल शेतकऱ्यांनी स्वीकारायला हवा. शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मराठी भाषेत हे तंत्रज्ञान पोहचविले जात आहे. या पद्धतीने उसाचे एकरी 150 टन एवढे उत्पादन घेतले असून, आता एकरी 200 टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले, असे डॉ. नलवडे यांनी नमूद केले.
      कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विवेक भोईटे यांनी सांगितले की, राज्यात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुमारे 1000 शेतकऱ्यांच्या क्षेत्रावर उसाचे पीक घेण्यात आले आहे. या तंत्रज्ञान वापरासाठी शेतकऱ्यांना 2 एकरासाठी रु.12500 एवढा कमी खर्च येत आहे. यावेळी ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे तुषार जाधव, धीरज शिंदे आदींनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नीरा भीमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार व दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, शेतकी विभागाचे कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...