मुख्य सामग्रीवर वगळा

*स्नेहा बारवे यांच्यावरील हल्ल्याचा इंदापूरात पत्रकारांनी नोंदवला जाहीर निषेध.*

इंदापूर :- दै. समर्थ भारतच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका बिल्डरने आणि त्याच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली. असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समीर राजे यांना ठार मारण्याची धमकी देखील दिली आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून; आंबेगाव तालुक्यात बीडच्या मस्साजोगची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंचर शहरातील एस कॉर्नर परिसरात
असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या
डेव्हलपरने त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या
तक्रारी केल्याचा संशय, मीटरमधे हेराफेरी,
बायपास, वीज चोरी आदी गोष्टी करत
असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय, तसेच
नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची
विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिका धारकांची फसवणूक होत असून, ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय? असा संशय मनात ठेवून संतापून सदर मुजोर बिल्डर यांनी स्नेहा बारवे यांना अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिलीये. घटने दरम्यान इसमाने पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बारवे यांच्या हातावर जोरात फटका देखील बसला आहे. 
संपादिका स्नेहा बारवे यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटना, इंदापूर तालुका जनसेवा पत्रकार संघाकडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे तसेच इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इंदापूर जनसेवा पत्रकार संघाकडून करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा पत्रकार संघटनेचे इंदापूर तालुकाध्यक्ष पत्रकार शिवाजी पवार, अतुल सोनकांबळे, महेश गडदे, अशोक घोडके, दत्तात्रय मिसाळ, सत्यजित रनवरे, दत्ता पारेकर, संजय शिंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 याबाबत शासनाने ठोस पाऊल उचलावे, जेणेकरून पत्रकारांवर होणारे हल्ले थांबतील. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, समाजाचे प्रश्न मांडत असताना काही गाव गुंडांकडून पत्रकारांवर हल्ले केले जातात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.- शिवाजी पवार, अध्यक्ष, जनसेवा पत्रकार संघटना इंदापूर तालुका.
-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...