मुख्य सामग्रीवर वगळा

*जगाला मार्गदर्शक ठरेल अशी आदर्श राज्यघटना भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केली.- ॲड . मनोहर चौधरी*

 इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 76 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव ॲड. मनोहर चौधरी यांनी वरील मत व्यक्त केले.ॲड.मनोहर चौधरी यांच्या हस्ते यावेळी ध्वजवंदन करण्यात आले.
   राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी उत्कृष्ट असे संचलन सादर केले.संविधान अमृत महोत्सवानिमित्त संविधान उद्देशिकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करून वाचन करण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय छात्र सेनेतील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला तसेच अर्थशास्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या अर्थशास्त्रीय सामान्य ज्ञान स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
      मनोहर चौधरी म्हणाले की,' भारतातील सर्व भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ही घटना तयार केली आहे आज यामुळे भारताची सर्व क्षेत्रात प्रगती होत आहे. घटनेच्या माध्यमातून शांतता , कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे .
       प्रा. कृष्णा ताटे म्हणाले की,' भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी आदर्श राज्यघटना आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती नेमली गेली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना तयार झाली. 26 जानेवारी 1950 पासून ही राज्यघटना अमलात आली.
     महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की ,' स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी ज्यांनी मोठे बलिदान दिले आहे , त्याग केला आहे , योगदान दिले आहे त्या स्वातंत्र्यवीरांना , महामानवाच्या कार्यास मी महाविद्यालयाच्या वतीने त्रिवार अभिवादन करतो. संविधानाचे अमृत महोत्सव आपण साजरे करत आहोत. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भारताला जगातील सर्वात मोठी राज्यघटना दिली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, कार्य करीत आहेत. इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या दोन विद्यार्थ्यांची सलग दोन वर्ष दिल्ली येथे परेडसाठी निवड झाली आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
  महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी सर्वांना प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दिल्या. इंदापूर महाविद्यालय सर्व क्षेत्रात प्रगती करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
     विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. 
    राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी प्रा. दिनेश जगताप ,कला शाखा विभाग प्रमुख डॉ.भिमाजी भोर ,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड यावेळी उपस्थित होते.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. भरत भुजबळ यांनी केले. आभार प्रा. बापू घोगरे यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...