मुख्य सामग्रीवर वगळा

*राजमाता जिजाऊ यांनी अनेक आघात होऊनही राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले- हर्षवर्धन पाटील*


  इंदापूर  स्वराज्य प्रेरिका राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त इंदापूर महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,' राजमाता जिजाऊ यांना आपल्या ७२ वर्षाच्या आयुष्यामध्ये खूप संकटाचा सामना करावा लागला परंतु अनेक आघात होऊनही राजमाता जिजाऊ यांनी राष्ट्रभक्तीचे संस्कार घडविले.' सरदार कान्होजी जेधे यांचे 14 वे वंशज युवराज यशवंत जेधे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कामधेनु परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉ. लक्ष्मण आसबे यांनी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास सांगितला.
     सुरुवातीला सरदार कान्होजी जेधे यांच्या शिवकालीन तलवारीची शोभायात्रा काढण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यांचे मान्यवरांनी पूजन करून झाली.
     अमर शहीद जवान ज्ञानदेव लक्ष्मण पवार रा. पवारवाडी ता. इंदापूर यांच्या वीरपत्नी सौ. सावित्रीबाई ज्ञानदेव पवार यांना मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच वीरपत्नी सुवर्णाताई डोईफोडे आणि आजी-माजी सैनिकांच्या माता किंवा पत्नी यांचा शिवभक्त परिवाराच्या वतीने साडी व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
     सीए परीक्षेत यश मिळवलेली श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व इंदापूर महाविद्यालयाच्या पदव्युत्तर वाणिज्य ( एम कॉम ) विभागाची विद्यार्थिनी श्रद्धा आण्णासाहेब  पाटील तसेच दिल्ली येथील राजपथावर परेडसाठी निवड झालेला इंदापूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी ऋषिकेश शिंदे आणि वर्ल्ड सायंटिस्ट पुरस्कार मिळवलेले महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुरेंद्र शिंदे व शिवप्रताप मर्दानी आखाडा पुरस्कार सन्मानित प्राप्तेश बर्गे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
    शिवप्रताप मर्दानी आखाडा पंधारवडी ता. इंदापूर येथील शिवभक्तांनी तलवारबाजी , दांडपट्टा , लाठीकाटी यासारख्या साहसी मर्दानी शिवकालीन युद्ध कला प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. श्री. नारायणदास रामदास विद्यालयातील विद्यार्थिनींनी देखील युद्ध कलेचे यावेळी प्रात्यक्षिक सादर केले.
      शिवभक्त परिवाराच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या माँसाहेब होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांना पाहता आला. आपल्या गुणवत्ता आणि विद्वत्तेच्या जोरावर ज्यांनी आपले नाव जगामध्ये मोठे केले असे स्वामी विवेकानंद यांचा आदर्श नव्या पिढीने घेतला पाहिजे.'
    युवराज यशवंत जेधे यांनी आपल्या घराण्याचा देदीप्यमान इतिहास सांगितला तसेच स्वराज्य कार्याचा प्रेरणा असणारा जेधे घराण्याचा कारी ता. भोर येथील वाडा पाहण्याचे त्यांनी आवाहन केले.
     डॉ. लक्ष्मण आसबे यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना इतिहासातील अनेक घटना, प्रसंग व त्यातील दाखले देत ऐतिहासिक माहिती दिली तसेच ते म्हणाले की जिजाऊंचे संस्कार आजच्या युवतींनी स्वीकारावे कारण त्यामध्ये चारित्र्य आणि राष्ट्र निर्मितीचे संस्कार आहेत. जन्मापासून संकटाचा सामना करणारे स्वराज्य निष्ठा असणारे सरदार कान्होजी जेधे यांचा छत्रपती शिवाजीराजांनी ' सर्जेराव' किताब देऊन सन्मान केला. अशी कर्तबगार तत्कालीन पिढी घडविण्याचे कार्य राजमाता जिजाऊ यांनी केले.
     यावेळी संस्थेचे सचिव ॲड. मनोहर चौधरी ,संचालक तुकाराम जाधव , विलासराव वाघमोडे तसेच पंचायत समितीच्या माजी सभापती ऋतुजा पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर , श्री. नारायणदास रामदास हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सोरटे ,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका फौजीया शेख, प्रा. कृष्णा ताटे, मेघश्याम पाटील, बाळासाहेब मोरे , धनंजय पाटील , मायाताई विंचू  , राजेंद्र पवार , विकास मोरे , कैलास कदम , सागर गाणबोटे ,गोरख शिंदे ,रघुनाथ राऊत,ललेंद्र शिंदे ,संतोष देवकर हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. नारायणदास रामदास विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड यांनी केले.
    प्रा. स्वाती राऊत यांनी राज्य व राष्ट्रगीत म्हटले.
   रघुनाथ पन्हाळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिवभक्त परिवाराचे सदस्य प्रकाश खांबसवाडकर यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...