*केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर आंदोलन*
इंदापूर
इंदापूर:- केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर गुरुवारी (दि.२५) आंदोलन करण्यात आले.प्रसंगी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
इंदापूर:- केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर गुरुवारी (दि.२५) आंदोलन करण्यात आले.प्रसंगी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील म्हणाले की,अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार,बेरोजगार,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. हा अर्थसंकल्प देशवासियांची निराशा करणारा आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल जातो. भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्याचा राग, द्वेष मनात ठेवून भाजप प्रणित केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पाठिंबा घेऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेने महसूल कमी असताना ही आंध्र प्रदेश आणि बिहारला भरीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध करतो.
____________________________________________
आप्पासाहेब जगदाळे.संचालक,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक.
__________________________________________
ॲड. तेजसिंह पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
_____________________________________________
टिप्पण्या