मुख्य सामग्रीवर वगळा

*केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर आंदोलन*

इंदापूर 
  इंदापूर:- केंद्र सरकारचा अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी अन्यायकारक असल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर तहसील कचेरीवर गुरुवारी (दि.२५) आंदोलन करण्यात आले.प्रसंगी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कर्मयोगी चे उपाध्यक्ष भरतशेठ शहा,बापूराव जामदार, तालुका अध्यक्ष ॲड. तेजसिंह पाटील,अशोक घोगरे, शहराध्यक्ष ॲड.इनायतअली काझी, शकील सय्यद,कांतीलाल झगडे, सागर मिसाळ, अमोल मुळे, छाया पडसळकर, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, गणेश महाजन, पी.पी पवार,निवास शेळके,  पुणे जिल्हाउपाध्यक्षा विजयाताई कोकाटे,रेश्मा शेख, तमन्ना शेख, सुनीता नरुटे, श्रीकांत मखरे, विकास खिलारे, सिकंदर बागवान, , अनिल ढावरे, अजय पारसे, अक्षय सुर्यवंशी, भारत यादव, नारायण वीर, दीपक गुरगुडे, उमेश ढावरे, युवराज सरक यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष ॲड.तेजसिंह पाटील म्हणाले की,अर्थसंकल्पात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी,कामगार,बेरोजगार,अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद करण्यात आली नाही. हा अर्थसंकल्प देशवासियांची निराशा करणारा आहे. महाराष्ट्रातून केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल जातो. भारताच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या विरोधात महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून दिले. त्याचा राग, द्वेष मनात ठेवून भाजप प्रणित केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पाठिंबा घेऊन एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या तुलनेने महसूल कमी असताना ही आंध्र प्रदेश आणि बिहारला भरीव तरतूद करण्यात आली. त्यामुळे या दुटप्पी धोरणाचा जाहीर निषेध करतो. 

____________________________________________

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या ३१ जागा निवडून दिल्या. त्यामुळे केंद्र सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण व सर्वसामान्यांच्यासाठी कोणतीही बरीव तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले.
आप्पासाहेब जगदाळे.संचालक,पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक.

__________________________________________

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी पुणे येथील भाजपच्या कार्यकर्त्या मेळ्यात बोलताना जे अनुद्गार काढले ते महाराष्ट्राच्या अभिमानाला, स्वाभिमानाला तसेच महाराष्ट्राला दुखावणारे होते. त्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या. स्वतः च्या राज्यातील परिस्थिती बिकट असताना पवार यांच्यावर खोटेनाटे आरोप केले. त्या सर्व आरोपांचा आणि वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. भाजपाचे नेते असेच बिनबुडाचे आरोप करीत राहिले तर जनक्षोभ आंदोलन करू.

ॲड. तेजसिंह पाटील, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष.
_____________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...