इंदापूर:-प्रतिनिधी दि.31/1/24 आमदार अनिल बाबर आमचे जिवलग मित्र होते. अत्यंत सकारात्मक विचाराने राजकारण, समाजकारण करणाऱ्या राज्यातील सुसंस्कृत नेत्यांपैकी एक होते. त्यांच्या जाण्याने तळागाळातील सर्वसामान्य माणसाचा नेता हरपला आहे, या शब्दात भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आ.अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, खानापूर-आटपाडी भागाचे विधिमंडळात लोकप्रतिनिधित्व करणारे आ.अनिल बाबर व आंम्ही अनेक वर्षे विधिमंडळात सहकारी म्हणून काम केले. खानापूर-आटपाडी भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. टेंभू योजनेचे ते जनक होते. अतिशय मनमिळाऊ व प्रेमळ असा त्यांचा स्वभाव होता. दोनच दिवसांपूर्वी सातारला मंत्री शंभूराजे देसाई यांच्या मुलाच्या लग्नात आमची भेट झाली, त्यावेळी आमच्या नेहमीप्रमाणे विविध विषयावर गप्पा झाल्या. मात्र आज अचानकपणे त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून आम्हांस धक्का बसला आहे. आ.अनिल बाबर यांच्या जाण्याने खानापूर-आटपाडी, सांगली जिल्ह्याचे नुकसान झाले असून महाराष्ट्राने एक सुसंस्कृत नेता गमावला आहे, या शब्दात हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24 ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते. सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले. त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ...
टिप्पण्या