मुख्य सामग्रीवर वगळा

मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांचा घात केला,ओ.बी.सी. तुन आरक्षण दिले शिवसेना जातीच राजकारण करते, -इंदापूर शहरप्रमुख अशोक देवकर यांचा राजीनामा.

इंदापूर :- अशोक देवकर शिवसेना शहर प्रमुख इंदापूर शिंदे गटाचा..राजीनामा देत आहे ह्या शिंदे सरकारने ओ.बी.सी. समाज बांधवांचा घात केलेला आहे ओ.बी.सी. तुन आरक्षण दिलेले आहे कारण मी पन एक ओ.बी.सी आहे त्या मुळे राजीनामा देत आहे व शिवसेना जी आहे ही शिवसेना जातीच राजकारण करणारी शिवसेना आहे.त्या मुळे जे कोणी ह्या शिंदे गटात.ओ.बी.सी चे बंधु व भगिनी आहेत त्यानी सर्वानी ह्या मिंदे गटाचा राजीनामा द्यावा व आपला ओ.बी.सी.चा मुख्यमंत्री..मा.श्री भुजबळ साहेब कसे होतायत हे बघाव शिंदे साहेब जर मराठा बांधव मुंबई ला आले की तुम्हीच आणले हे सर्वाना माहीतीय ओ.बी.सी बांधव लवकरच मुंबई ला येणार त्या वेळेस तुम्हाला समजेल ओ.बी.सी ची ताकद काय आहे...इंदापूर शहरप्रमुख अशोक देवकर यांनी पदाचा राजीनामा दिला, मराठा आरक्षणाचा लढा उभारल्यानंतर मराठा समाज हा लाखोंच्या संख्येने मुंबईत जमा झाला व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचलले परंतु यानंतर मात्र महाराष्ट्रात ठीक ठिकाणी ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याचाच एक भाग इंदापूर तालुक्यात पहायला मिळाला. इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे इंदापूर शहरप्रमुख जे शिवसेनेमध्ये खूप सक्रिय होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री यांनी आमच्या समाजावर अन्याय करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सकारात्मक पावले उचलले आहे आणि म्हणून मी शिवसेना शहरप्रमुखाचा राजीनामा देत आहे असे अशोक देवकर यांचे म्हणणे आहे, अशोक देवकर म्हणाले की,”मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांचा घात केलेला आहे, ओ.बी.सी. तुन आरक्षण दिलेले आहे. मी पण एक ओ.बी.सी आहे त्यामुळे मी राजीनामा देत आहे. शिवसेना जी आहे ही शिवसेना जातीच राजकारण करणारी शिवसेना आहे.त्यामुळे जे कोणी ह्या शिंदे गटात ओ.बी.सी चे बंधु व भगिनी आहेत त्यानी सर्वानी ह्या मिंदे गटाचा राजीनामा द्यावा व आपला ओ.बी.सी.चा मुख्यमंत्री भुजबळ साहेब कसे होतील हे बघाव. पुढे ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना उद्देशून म्हणाले की,”शिदे साहेब जर मराठा बांधव मुंबई ला आले की तुम्हीच आणले हे सर्वाना माहीतीय ओ.बी.सी बांधव लवकरच मुंबई ला येणार त्या वेळेस तुम्हाला समजेल ओ.बी.सी ची ताकद काय आहे”.अशा पद्धतीने एकंदरीतच आता राजीनाम्याचे सत्र महाराष्ट्रातून निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जय भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडीमध्ये वार्षिक क्रिडा सप्ताहाचे आयोजन*

 इंदापूर जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित, विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17 /11/ 2025 ते 22/11/2025 रोजी क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.   खेळ ही शारीरिक व मानसिक कला आहे. खेळामुळे शारीरिक  चपळता वाढते.खेळाचे प्रामुख्याने मैदानी खेळ व बैठे खेळ असे दोन प्रकार मानले जातात. प्रशालेमध्ये क्रिकेट, कबड्डी, खो-खो,लंगडी, रस्सीखेच,रिले 100 मी ,रिले 400 मी, थालीफेक इ खेळाचे आयोजन करण्यात आले.  विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशानेच प्रशालेमध्ये क्रिडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.  क्रिडा सप्ताहाच्या निमित्ताने प्रशालेतील मैदानावर विविध खेळाची जयंत तयारी करण्यात आली.  क्रिडा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे तसेच मैदान पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  मशाल फेरी काढून विविध खेळांच्या सामन्यांची सुरवात करण्यात आली.   कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या निकेतन स्कूल जुनियर कॉलेजचे प्राचार्य गणेश पवार...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...