मुख्य सामग्रीवर वगळा

मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांचा घात केला,ओ.बी.सी. तुन आरक्षण दिले शिवसेना जातीच राजकारण करते, -इंदापूर शहरप्रमुख अशोक देवकर यांचा राजीनामा.

इंदापूर :- अशोक देवकर शिवसेना शहर प्रमुख इंदापूर शिंदे गटाचा..राजीनामा देत आहे ह्या शिंदे सरकारने ओ.बी.सी. समाज बांधवांचा घात केलेला आहे ओ.बी.सी. तुन आरक्षण दिलेले आहे कारण मी पन एक ओ.बी.सी आहे त्या मुळे राजीनामा देत आहे व शिवसेना जी आहे ही शिवसेना जातीच राजकारण करणारी शिवसेना आहे.त्या मुळे जे कोणी ह्या शिंदे गटात.ओ.बी.सी चे बंधु व भगिनी आहेत त्यानी सर्वानी ह्या मिंदे गटाचा राजीनामा द्यावा व आपला ओ.बी.सी.चा मुख्यमंत्री..मा.श्री भुजबळ साहेब कसे होतायत हे बघाव शिंदे साहेब जर मराठा बांधव मुंबई ला आले की तुम्हीच आणले हे सर्वाना माहीतीय ओ.बी.सी बांधव लवकरच मुंबई ला येणार त्या वेळेस तुम्हाला समजेल ओ.बी.सी ची ताकद काय आहे...इंदापूर शहरप्रमुख अशोक देवकर यांनी पदाचा राजीनामा दिला, मराठा आरक्षणाचा लढा उभारल्यानंतर मराठा समाज हा लाखोंच्या संख्येने मुंबईत जमा झाला व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचलले परंतु यानंतर मात्र महाराष्ट्रात ठीक ठिकाणी ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याचाच एक भाग इंदापूर तालुक्यात पहायला मिळाला. इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे इंदापूर शहरप्रमुख जे शिवसेनेमध्ये खूप सक्रिय होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री यांनी आमच्या समाजावर अन्याय करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सकारात्मक पावले उचलले आहे आणि म्हणून मी शिवसेना शहरप्रमुखाचा राजीनामा देत आहे असे अशोक देवकर यांचे म्हणणे आहे, अशोक देवकर म्हणाले की,”मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांचा घात केलेला आहे, ओ.बी.सी. तुन आरक्षण दिलेले आहे. मी पण एक ओ.बी.सी आहे त्यामुळे मी राजीनामा देत आहे. शिवसेना जी आहे ही शिवसेना जातीच राजकारण करणारी शिवसेना आहे.त्यामुळे जे कोणी ह्या शिंदे गटात ओ.बी.सी चे बंधु व भगिनी आहेत त्यानी सर्वानी ह्या मिंदे गटाचा राजीनामा द्यावा व आपला ओ.बी.सी.चा मुख्यमंत्री भुजबळ साहेब कसे होतील हे बघाव. पुढे ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना उद्देशून म्हणाले की,”शिदे साहेब जर मराठा बांधव मुंबई ला आले की तुम्हीच आणले हे सर्वाना माहीतीय ओ.बी.सी बांधव लवकरच मुंबई ला येणार त्या वेळेस तुम्हाला समजेल ओ.बी.सी ची ताकद काय आहे”.अशा पद्धतीने एकंदरीतच आता राजीनाम्याचे सत्र महाराष्ट्रातून निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...