मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इंदापूरः बायपास पुणे सोलापूर हायवेवर C.N.G.गॅस पंपामुळे हायवेवर गाड्यांची पार्किंग होत आहे आणि त्याठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे सरडेवाडी,शहा,महादेवनगर,कांदलगांव, हिंगणगाव, तरटगांव, बाभुळगाव, भिमानगर, रांजणी, आढेगांव, उजनी.यागावातील नागरिकांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यापंपामुळे मोटारसायकल वरती पंपामुळे येणे खुप अवघड झाले आहे काही अपघात झालेल्या लोकांनी सुद्धा पंपामुळे आमचा अपघात झाला आहे तुम्ही काही तरी करा अशी विनंती केल्यामुळे मा.संजय भैय्या सोनवणे अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी पश्चिम महाराष्ट्र यांनी 20/9/2021 रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने या पंपामुळे अपघात वाढत आहेत त्या ठिकाणी रोडवरील ट्राफिक जाम करू नये आणि याठिकाणी यापुढे पंपामुळे अपघात झाला तर पंप मालकाला त्यामध्ये सह आरोपी करण्यात यावे. यासाठी आंदोलन करणार असे पत्र दिले त्यानंतर इंदापूर चे कार्यक्षम तहसीलदार मा.श्रीकांत पाटील साहेब यांनी यामध्ये लक्ष घालून इंदापूरचे नुतन पोलिस निरीक्षक मा.तय्युब मुजावर साहेब यांना याबाबतीत काय त्या सुचना केल्या नंतर मुजावर साहेबांनी काल या पंपाच्या ठिकाणी मा.संजय भैय्या सोनवणे यांना आपण त्याठिकाणी या मी पण उपस्थित राहतो पंपमालक पण त्याठिकाणी आहेत आणि आपल्या सुचनेनुसार त्याठिकाणी बदल करू असे सांगितले मग त्याठिकाणी सर्वजण एकत्र आल्यानंतर मा.संजय भैय्या सोनवणे यांनी अनेक जनतेच्या हितासाठी सुचना केल्या मुजावर साहेबांनी पण सुचना केल्या आणि पंपमालकाला त्याठिकाणी बदल करायला सांगितले आणि हे नाही केलं आणि इथे अपघात झाला तर कारवाई करणार हे पण त्यांनी ठणकावून सांगितले पंपाची पार्किंग पाहणी करताना पोलिस निरीक्षक मा.तय्युब मुजावर साहेब, पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष मा.संजय भैय्या सोनवणे, पंपमालक व्यवहारे , पोलिस कर्मचारी उपस्थित होते यापुढे बदल नाही केला तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी च्या वतीने पुणे सोलापूर हायवेवर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असेही मा.संजय भैय्या सोनवणे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...