मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

  इंदापूर:-जिजाऊ  ब्रिगेड महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांनी जिजाऊ ब्रिगेड पुणे जिल्हा कार्यकारिणी मंडळ, पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेतली, जिजाऊ  ब्रिगेड महाराष्ट्रच्या कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांचा पुणे(पुर्व) जिल्हाध्यक्षा प्रा जयश्री गटकुळ  यांच्या हस्ते शाल,  श्रीफळ,ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला
 *मराठा सेवा संघाने महिलांना वैचारिक पातळीवर  कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी, अंधश्रद्धा,अनिष्ट रूढी,परंपरा नष्ट व्हाव्यात या उद्देशाने जिजाऊ ब्रिगेड  संकल्पनेची सुरुवात केली विधायक कार्यात अत्यंत निरागस,प्रसन्न, उत्साहपूर्वक मानसिकता निर्माण होते, सहकार्याची भूमिका घेतल्याने समाजविकास होतो आणि समाजाकडून आपोआप आशीर्वाद मिळतो, जिजाऊ ब्रिगेड पुणे पुर्व जिल्ह्यामध्ये इंदापूर, बारामती, शिरूर, हवेली, मुळशी दौंड, पुरंदर, जुन्नर या आठ तालुका अंतर्गत जिजाऊ ब्रिगेड चे  कार्य कौतुकास्पद असून खुप मोठे महिला संगठन आणि संगठनात्मक कार्य करणारा पुणे जिल्हा महाराष्ट्रात अग्रेसर आहे, यापुढील कार्यास शुभेच्छा देत युवा पिढी, महिला यांनी अशा विधायक कार्यात सहभागी व्हावे* असे आवाहन   जिजाऊ  ब्रिगेड महाराष्ट्र कार्याध्यक्षा नंदाताई शिंदे यांनी केले.
*सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून  छत्रपती शिवराय,  शाहू,फुले,आंबेडकर .. महामानव आणि राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्यादेवी, क्रांतिज्योती सावित्रीमाई, रमाई... अशा महान नारीशक्ती यांची विचारधारा जनमानसात नेण्याचे जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचे कार्य असून अशा विधायक कार्यासाठी समाजातून प्रोत्साहन मिळत आहे.* असे मत जिजाऊ ब्रिगेड पुणे(पुर्व) जिल्हाध्यक्षा प्रा जयश्री गटकुळ यांनी व्यक्त केले,
जिजाऊ ब्रिगेड पुणे(पुर्व) कार्यध्यक्षा शिवमती जयश्री खबाले यांनी प्रास्ताविक केले.जिजाऊ ब्रिगेड इंदापूर तालुकाध्यक्षा शिवमती राधिका निवास शेळके यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष राहुल गुंडेकर, प्रतिक झोळ, सागर जाधव, योगेश्री गटकुळ, वैशाली गटकुळ , राजश्री जगताप अन्य मान्यवर उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...