मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

 इंदापूर:-भाजपामध्ये प्रवेश केलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक श्री.भाऊसाहेब सपकळ स्वग्रही परतले,आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री.दत्तात्रय (मामा) भरणे साहेबांच्या* प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
विधानसभेला भरणे मामांच्या विरोधात बंड करणाऱ्यांपैकी श्री.भाऊसाहेब सपकळ हे एक होते.परंतु आज पुन्हा एकदा माननीय भरणे मामांचे नेतृत्व मान्य करत त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले.
प्रवेश समारंभ प्रसंगी नामदार भरणे साहेबांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.
दोन च दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांतराव पाटील,संग्रामसिंह पाटील,कुलदिप पाटील,भोडणीचे प्रमुख नेते व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ॲड.संचित तानाजीराव हांगे यांनी प्रवेश केला होता,त्यानंतर पुन्हा एकदा आज माननीय भरणे मामांनी भाऊसाहेब सपकळांना प्रवेश देऊन राष्ट्रवादी काँग्रेसची अजून जास्तीची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने जोरदार आगेकूच केली आहे.यावेळी बोलताना भाऊसाहेब सपकळ यांनी सांगितले की,विधानसभा निवडणुकीत थोड्याशा गैरसमजातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मधुन बाहेर पडलो होतो.
परंतु या पुढे मात्र इंदापूर तालुक्याला माननीय भरणे मामा व राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही याची पुर्णपणे खात्री पटल्याने आम्ही सर्व सहकाऱ्यांसह माननीय भरणे मामांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून येथून पुढे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब,लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे व आदरणीय मामांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करणार  असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी तालुकाध्यक्ष हनुमंतराव कोकाटे-पाटील,पंचायत समितीचे मा.सभापती प्रशांतबापू पाटील,कार्याध्यक्ष अतुल शेठ झगडे,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिनदादा सपकळ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे उपाध्यक्ष सुरेश शिंदे सर,बावड्याचे जेष्ठ नेते विजयराव घोगरे,संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर बाबा मिसाळ,तालुका उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापूरे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...