मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज, शिव सृष्टी न्युज

इंदापूरःवडापुरी (ता.इंदापूर, पुणे) येथील संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त नंदीवाला समाजाचे आराध्य दैवत (कुलदैवत) अंबाजी- लिंबाजी देवस्थान आहे. गेली ३०० वर्षा पासूनची अंबाजी- लंबाजी देवस्थान यात्रेची व समाजाची परंपरा असून महाराष्ट्रभर हा नंदीवाला समाज आपला उदरनिर्वाह करण्यासाठी भटकत असतो.

गेली ३०० वर्षापासून इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावात तीन वर्षातून एकदा हा नंदीवाला समाज एकत्रीत येत असतो. एक महिना वडापुरी गावात पाल (राहुटी) ठोकून आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या कुलदैवताच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातुन  तसेच देशभरातून  वडापुरी येथे नंदीवाला समाज एकत्रीत येत असतो. अनेक रूढी, परंपरा आपल्या पारंपारिक पद्धती जपत असतो. अनेक विचारांची देवाण-घेवाण, लग्नकार्य असे कार्यक्रम होत असतात.
या साठी गेली अनेक वर्षापासून वडापुरी गावातील १९ एकर जमीन अंबाजी -लिंबाजी  देवस्थान व नंदीवाला समाज मागणी करत असून अनेक शासकीय कार्यालयात प्रस्ताव गायरान राखीव जागेचीसाठी सादर केले आहेत. वडापुरी ग्रामपंचायत पासून ते मंत्रालयापर्यंत कागदपत्राची देवाण-घेवाणं पत्रव्यवहार केला असून वडापुरी ग्रामपंचायतीने ठराव ,इंदापूर पंचायत समितीचे ठराव , जिल्हा परिषदेत ठराव असे अनेक प्रकारचे ठराव करून कागदपत्राची पूर्तता करून नंदीवाले समाजातील सामाजिक कार्यकर्ते व कार्यकर्त्यांना एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हेलपाटे मारत राहिला आहे .या भटक्या समाजाला हेलपाटे घालायला लावण्यामागे  नेमके जबाबदार कोण ?

इंदापूर तालुक्यातील  वडापुरी गावातील गायरान जमीन गट क्रमांक-७३९ (१)(अ) मधील ७.६० आर म्हणजेच १९ एकर जागेची मागणी करत आहेत. समाजातील कुलदैवताची यात्रेसाठी, सांस्कृतिक कार्यक्रम, आचार -विचाराची देवान-घेवाणं,  सार्वजनिक सुविधा, सार्वजनिक प्रयोजन, धार्मिक कार्यक्रमासाठी, घरकुल निवास यासाठी या जागेचे आम्ही गेली अनेक वर्षे मागणी करत आहोत.
अनेक आमदार, खासदार , राज्यकर्त्यांना,  सामाजिक कार्यकर्त्यांना निवेदन दिले आहेत .अनेकांनी आम्हाला प्रत्येक निवडणुकीत आश्वासने दिली पण त्या आश्वासनाची आणि आमच्या मागणीची पूर्तता झाली नसून  अंबाजी-लिंबाजी देवस्थानाची आणि समाजाची  फसवणूक झाली  आहे. जोपर्यंत जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा असाच लढा देणार असुन वेळप्रसंगी आम्ही न्यायालयीन लढा लढण्याची तयारीत आहोत. नंदीवाला समाजातील सामाजिक कार्यकर्ते दशरथ पवार यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.
----------------------------------------------------
चौकट : -
*अंबाजी- लिंबाजी देवस्थान तीनशे वर्षांची परंपरा*

 अंबाजी- लिंबाजी देवस्थान इंदापूर तालुक्यातील वडापुरी गावातील प्रसिद्ध  देवस्थान असून नंदीवाला समाजाचे कुलदैवत आहे. गेली तीनशे वर्षापासून या समाजाची यात्रेची परंपरा असून या समाजातील कार्यकर्त्यांनी खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना अनेक वेळा निवेदन दिले असून गेल्या पंचवार्षिक ला राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आमदार असताना त्यांनी हा प्रश्न विधानसभेतही मांडला होता .महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी या प्रश्नासाठी पाठपुरावा केला होता. तरीही कुठलाच ठोस निर्णय अंबाजी- लिंबाजी देवस्थान व नंदिवाला समाजासाठी झाला नाही. इंदापूर तालुक्यामध्ये नंदीवाला समाजाचे ५ हजार ७० च्या आसपास मतदान असुन महाराष्ट्रात १६ लाख नंदीवाला समाजीची मते लोकसभेला होत असतात. येणाऱ्या काळामध्ये या नंदीवाला समाजातील युवकांनी आणि समाजातील नागरिकांनी आणि समाजाने वेगळा निर्णय घेतल्यास चमत्कार घडू शकतो .आणि चमत्कार दाखवल्या शिवाय नमस्कार होत नाही अशी म्हणं आहे.

              *दशरथ पवार*
 (नंदीवाला समाजाचे या प्रश्नाचे पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते)
_________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...