मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर: क्रिकेट मुळे मन आणि शरीर तंदुरुस्त होते,जीवनातील ताण तणाव सुद्धा यामुळे कमी होण्यास मदत होते म्हणून जीवनात खेळास अनन्यसाधारण महत्व असते असे मत लोकप्रिय जि प सदस्या युवारत्न अंकिताताई हर्षवर्धनजी पाटील यांनी व्यक्त केले.गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब इंदापूर यांनी अंकिताताई पाटील  यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यावेळी त्या बोलत होत्या.
या वेळी गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब चे त्यांनी विशेष कौतुकही केले कारण गेल्या 4 वर्षांपासून विविध क्षेत्रातील लोक एकत्र येऊन दररोज सकाळी अखंडितपणे क्रिकेट खेळत आहेत, यातून समाजातील एकात्मता वाढण्यास मदतही होते असेही त्या यावेळी म्हणाल्या.
यावेळी राधा-कृष्ण हॉटेल मध्ये माजी नगरसेवक गोरखभाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत युवारत्न अंकिताताई पाटील यांचा सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्यावतीने वाढदिवसानिमित्त राधिका नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. 
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब मधील सदस्य हे विविध राजकीय पक्षातील, व्यापारी, पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील आहेत. हे सर्व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून क्रिकेटचे सामने व सामाजिक उपक्रम राबवत असतात. विशेष म्हणजे विविध पक्षातील कार्यकर्ते - पदाधिकारी असले तरी सामाजिक उपक्रम एकत्रित राबवतात . या गोष्टीचा मला अभिमान आहे असेही त्या म्हणाल्या.
गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब दरवर्षी मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने भरवीत असतात गेल्या वर्षी भारताचा अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण यास बक्षीस वितरण करण्यास आणले होते याचीही आठवण युवारत्न अंकिताताई पाटील यांनी काढली.त्याच प्रमाणे फेब्रुवारी महिन्यात भरविण्यात येणाऱ्या डे-नाईट सामन्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीयश नलवडे यांनी केले तर सूत्रसंचालन भाऊसाहेब शिंदे यांनी केले.कार्यक्रमास आभार माजी नगरसेवक गोरखभाऊ शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी उपस्थित सदस्यांमध्ये गोरखभाऊ शिंदे,भाऊसाहेब शिंदे,सागर गानबोटे,श्रीयश नलवडे,अनिल अण्णा पवार, संजय शिंदे (डोनाल्ड),सुनील गुळूमकर,नितीन रणवरे,बापू काळे, दत्तात्रय घाडगे, संजय सानप,उदय शेठे,निलेश केदारने,निलेश मनाले, किरण घाडगे,बालाजी आडसुळे,संभाजी सूर्यवंशी,विदेश कांबळे, अंकुश चव्हाण, विजय भापकर, नाना शिंदे, सागर साळुंखे,रोहित शिंदे,प्रवीण सातपुते,विनोद हरणावळ,सुनील सिद्धापुरे,अनिल सिद्धापुरे,सौरभ किर्वे इत्यादी युवक उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते