मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर,
  जागतिक कोरोना महामारी मृत्यूदराच्या  तुलनेत भारतातील कोरोना मृत्युदरफारचकमी असून त्याचे श्रेय केंद्रीयआयुषमंत्रालयनिर्देशित पंचतुलसी, हळदी काढयास जाते. त्यामुळे आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन इंटर नॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन कंपनीचे क्राऊन प्रेसिडेंट डॉ. प्रताप पवार यांनी केले.
 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंदापूर विद्या प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मोफत आरोग्य कार्यशाळेततेबोलत होते. कार्यशाळेस पुणे, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यातून १३५ प्रतिनिधी उपस्थितहोते . विद्या प्रतिष्ठान पॉलीटेकनीक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार वीर, 
आरोग्यसंदेशप्रतिष्ठान कार्याध्यक्ष तुषार रंजनकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुरेश जकाते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजिनाथ कळसाईत, सुजाता चांदणे, ज्ञानेश्वर देशमुख, प्रणव चांदणे,डॉ. जयप्रकाश खरड, राजू फलफले, जनार्धन क्षीरसागर, राजेंद्र शेलार, अजित शिंगाडे,
संतोष कोरके, स्वप्नाली बोबडे, अमोलराजे गायकवाड, अश्विनी नलवडे, सचिन घोरपडे , स्नेहल गानबोटे, अपर्णा उपरे, प्रशांत जवंजाळ आदींचा सेंद्रिय प्रचाराबद्दल सत्कार करण्यात आला.  
डॉ.पवार पुढे म्हणाले, कोरोना महामारीमुळे औषधी वनस्पती व भारतीय आयुर्वेदाचेमहत्व सर्वाना समजले असून तुळस, हळद,च्यवन प्राश, संजीवनी वनस्पती लेह बेरीचे महत्व घरोघरी पोहोचले आहे. त्यामुळे आयर्वेदास जनाश्रय प्राप्त झाला असून याशास्त्राचेमहत्व सर्वाना पटले आहे. त्यामुळे या शास्त्रास जागतिक राजाश्रय मिळवूनदेण्यासाठीनियोजन बद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी स्वदेशी, केमिकल विरहित सेंद्रिय औषधे, पशुधन दूध वाढीची औषधे, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
  यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले, कोरोना कालावधीत पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब ,कैदी तसेच हितचिंतकाना केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुचवलेला तुलसी व हळदी काढा वापरला असता त्यांना चांगला फरक पडला. काही कोरोना पोजीटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले यावेळी प्राचार्य राजकुमार वीर,चेअरमन स्टार डॉ.उदय फडतरे, डॉ.संदेश शहा, अर्चना झरकर, नामदेव गानबोटे, डॉ. जय शहा, प्रियंका शहा यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक पंकज तांबोळी, सूत्रसंचालन डॉ. आरती फडतरे व डॉ. श्राविका शहा तर  आभार ब्रह्मदेव थोरात यांनी मानले.
फोटो १)इंदापूर - मोफत आरोग्यकार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रताप पवार.
२) इंदापूर - मोफत आरोग्य कार्यशाळेस चार जिल्ह्यातून उपस्थित मान्यवर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...