मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर,
  जागतिक कोरोना महामारी मृत्यूदराच्या  तुलनेत भारतातील कोरोना मृत्युदरफारचकमी असून त्याचे श्रेय केंद्रीयआयुषमंत्रालयनिर्देशित पंचतुलसी, हळदी काढयास जाते. त्यामुळे आयुर्वेद ही सुखी जीवन जगण्याची आदर्श गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन इंटर नॅशनल मार्केटिंग कार्पोरेशन कंपनीचे क्राऊन प्रेसिडेंट डॉ. प्रताप पवार यांनी केले.
 अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या  पुणे जिल्हा व इंदापूर तालुका मराठीपत्रकार संघ, आरोग्य संदेश बहुद्देशीय समाजसेवी प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंदापूर विद्या प्रतिष्ठान सभागृहात आयोजित मोफत आरोग्य कार्यशाळेततेबोलत होते. कार्यशाळेस पुणे, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यातून १३५ प्रतिनिधी उपस्थितहोते . विद्या प्रतिष्ठान पॉलीटेकनीक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार वीर, 
आरोग्यसंदेशप्रतिष्ठान कार्याध्यक्ष तुषार रंजनकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सुरेश जकाते यावेळी उपस्थित होते. यावेळी अजिनाथ कळसाईत, सुजाता चांदणे, ज्ञानेश्वर देशमुख, प्रणव चांदणे,डॉ. जयप्रकाश खरड, राजू फलफले, जनार्धन क्षीरसागर, राजेंद्र शेलार, अजित शिंगाडे,
संतोष कोरके, स्वप्नाली बोबडे, अमोलराजे गायकवाड, अश्विनी नलवडे, सचिन घोरपडे , स्नेहल गानबोटे, अपर्णा उपरे, प्रशांत जवंजाळ आदींचा सेंद्रिय प्रचाराबद्दल सत्कार करण्यात आला.  
डॉ.पवार पुढे म्हणाले, कोरोना महामारीमुळे औषधी वनस्पती व भारतीय आयुर्वेदाचेमहत्व सर्वाना समजले असून तुळस, हळद,च्यवन प्राश, संजीवनी वनस्पती लेह बेरीचे महत्व घरोघरी पोहोचले आहे. त्यामुळे आयर्वेदास जनाश्रय प्राप्त झाला असून याशास्त्राचेमहत्व सर्वाना पटले आहे. त्यामुळे या शास्त्रास जागतिक राजाश्रय मिळवूनदेण्यासाठीनियोजन बद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीतजास्त लोकांनी स्वदेशी, केमिकल विरहित सेंद्रिय औषधे, पशुधन दूध वाढीची औषधे, सौंदर्य प्रसाधने, घरगुती वापराच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
  यावेळी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर म्हणाले, कोरोना कालावधीत पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंब ,कैदी तसेच हितचिंतकाना केंद्रीय आयुष मंत्रालयाने सुचवलेला तुलसी व हळदी काढा वापरला असता त्यांना चांगला फरक पडला. काही कोरोना पोजीटिव्ह रुग्ण निगेटिव्ह झाले यावेळी प्राचार्य राजकुमार वीर,चेअरमन स्टार डॉ.उदय फडतरे, डॉ.संदेश शहा, अर्चना झरकर, नामदेव गानबोटे, डॉ. जय शहा, प्रियंका शहा यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक पंकज तांबोळी, सूत्रसंचालन डॉ. आरती फडतरे व डॉ. श्राविका शहा तर  आभार ब्रह्मदेव थोरात यांनी मानले.
फोटो १)इंदापूर - मोफत आरोग्यकार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. प्रताप पवार.
२) इंदापूर - मोफत आरोग्य कार्यशाळेस चार जिल्ह्यातून उपस्थित मान्यवर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते