मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

  इंदापूर: जिल्हा परिषद सदस्या व ऑल इंडिया शुगर मिल असोसिएशनच्या (इस्मा) कायदेशीर उपसमितीच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर, नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी, श्री. नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालय शिरसोडी, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर 1, महात्मा फुले विद्यालय बिजवडी, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर, कला महाविद्यालय भिगवन याठिकाणी वृक्षारोपण तसेच निबंध, वक्तृत्व, चित्रकला, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
    संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , संस्थेचे उपाध्यक्ष पद्मा भोसले यांनी या उपक्रमाचे कौतुक केले तसेच असे सामाजिक उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी असतात अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
    कोरोना पार्श्वभूमी असल्याने अंकिता पाटील यांनी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी तसेच पर्यावरण संवर्धनासारखे उपक्रम घेण्याचे आवाहन केले होते. तसेच इंदापूर तालुक्यामध्ये 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता. तालुक्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयाने या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला.
   विद्यार्थी, युवक युवतींचा सहभागाबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने तसेच विविध स्पर्धेच्या माध्यमातून सहभाग घेतल्याने आनंद झाल्याची प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी यावेळी दिली. 
    श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज इंदापूर चे मुख्याध्यापक विकास फलफले, नंदकिशोर प्रगती विद्यालय सराफवाडी चे मुख्याध्यापक  एन. आर .मोमीन, श्री. नानासाहेब केरबा व्यवहारे विद्यालय शिरसोडी च्या मुख्याध्यापिका झेड. टी. घाडगे, उत्कर्ष विद्या मंदिर कालठण नंबर 1 च्या मुख्याध्यापिका ए. ए. सर्जेराव ,महात्मा फुले विद्यालय बिजवडी चे मुख्याध्यापक शिवाजी कांबळे, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर चे प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपप्राचार्य प्रा.नागनाथ ढवळे, कला महाविद्यालय भिगवन चे प्राचार्य डॉ.महादेव वाळुंज तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...