मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज


शेकडो तक्रारी होवून सुध्दा सारंगकरांवर कारवाई होत नाही,त्यांना वरदहस्त कोणाचा-अॅड राहुल मखरे


इंदापूर :पोलिस स्टेशनचे पी.आय सारंगकर व त्यांचे पोलिस स्टेशनचे २/३ सहकारी यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला व्यक्तीगत धंद्याचा आड्डा बनवून सर्वसामान्य लोकांची गेल्या ८ ते ९ महिन्यापासून छळवणूक सुरू केली आहे. इंदापूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावातील सर्वसामान्य लोकांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. खरे गुन्हे दाखल
करून घेतले नाहीत.अशी माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे महासचिव अॅड राहुल मखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली या वेळी प्रविण बाबर, गणपत बाबर, उपस्थित होते, त्या नंतर बोलताना राहूल मखरे म्हणाले की,१) काटी येथील एका प्रकरणात फॅक्चरचे मेडिकल सर्टिफिकेट असताना ३२६ ऐवजी ३२४ कलम लावून गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन होण्यासाठी मदत केली होती.

२) बळ पुडी व इंदापूर येथील देवकाते - करे यांच्यावर खोटा ३०६ चा गुन्हा दाखल करून त्यांना अनेक दिवस तुरूंगात ठेवले.
३) बेडशिंग येथील बन कुटुंबियांचा छळ केला.
४) इंदापूर शहरातील गोरगरीब, भटक्या-विमुक्त लोकांना मारहाण करून धमक्या दिल्या.
५) प्रतिष्ठित लोक, व्यापारी यांना शिवीगाळ करून, अपमान करून हाकलून दिले.
६) प्रविण बाबर यांच्या वरती खोटा ३७९ गुन्हा दाखल केला. त्याच्या आई व पत्नीला अश्लील शिवीगाळ करून त्यांनाआत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
७) गागरगाव प्रकरणात निदीष लोकांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर चुकीचा तपास करून आरोपींना मदत केली
अशा शेकडो तकारी आहेत ज्यामध्ये ख-याचे खोटे व खोट्याचे खरे गुन्हे दाखल करून लोकांना त्रास दिला आहे.संबंधित अन्यायग्रस्त लोकांनी पोलीस महासंचालक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे वारंवार लिखित तकारी केल्या आहेत.परंतु,
पी. आय सारंगकर व त्यांच्या सहका-यांवर अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. यामध्ये मंत्री महोदयांचा वरदहस्त आहे की
पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण या भ्रष्ट अधिका-याला वाचवत आहेत हा प्रश्न सर्व सामान्य लोकांना पडला यासंदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी व सर्व अन्यायग्रस्त लोकांना एकत्र करुन त्यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आसे अॅड. राहुलजी मखरे राष्ट्रीय महासचिव , बहुजन मुक्ती पार्टी म्हणाले 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...