मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार,दलिताच्या घरावर जेसिबी फिरवूनही नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस 
 इंदापूर  दलितांना विकासाचे गाजर दाखवून, बंदिस्त गटारीचे काम करताना दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून केलेल्या नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार तरंगवाडी (ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत तरंगवाडी ग्रामपंचायतीने दलित नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून दलितांच्या सोईकरिता बंदिस्त गटारीचे काम मे.मिसाळ ठेकेदाराकरवी करण्यात आले.हे काम करत असताना संबंधित ग्रामपंचायतीने सिमेंटचे पाईप गाडत असताना आम्हाला रस्ता खोदायची परवानगी नाही असे तोंडी कारण देत दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून संबंधित सिमेंट पाईप गाडण्यात आला. यादरम्यान संबंधित ग्रामसेवक, सरपंच तसेच ठेकेदार यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला तुमचे झालेले नुकसान आम्ही भरुन देवू असे तोंडी आश्वासन संबंधित कुटुंबाला दिले. आशी माहीती दिपकराव खिलारे यांनी दिली, 
मात्र या तोंडी आश्वासनानंतर संबंधित कुटुंबांनी नुकसानभरपाईची मागणी ग्रामपंचायत, ठेकेदार यांचे कडे केली असता संबंधित ग्रामसेवकाने मी तुम्हाला ओळखतही नाही, तर ठेकेदाराने सांगितले की, तुमचे बांधकाम हे अतिक्रमणात आहे. त्यामुळे आम्ही ते काढून टाकले आहे. तुम्हाला नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. अशी उडवाउडवीची दिली. 
परंतु दरम्यान नुकसानग्रस्त कुटुंबाने संबंधित ग्रामपंचायतीकडे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता लेखी अर्ज दिला होता. 
मात्र या अर्जाकडे साफ दुर्लक्ष करुन गेल्या वर्षापासून या दलित नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसानभाईपासून वंचीत ठेवले.                                                                            
□□□□□□ चौकट □□□□□□□


वास्तविक पाहता तरंगवाडी येथील दलित नागरिकांची संख्या अवघी ३९ आहे. हे गाव अवर्षणग्रस्त गाव आहे.या गावामध्ये वेळोवेळी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अश्या परिस्थितीमध्ये गावाला पिण्याला पाणी नाही. त्याठिकाणी गटार योजना राबविणे म्हणजे केवळ ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक तसेच ठेकेदार यांना जगण्याचा उद्योग आहे. असे म्हणण्यास वाव आहे.म्हणजे पिण्यास पाणी नाही. परंतु सांडपाणी वाहण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे.आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? हा प्रश्न वास्तविक पाहता संबंधित विभागाला पडण्याची गरज आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्याच्या राजकारणातील तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले - हर्षवर्धन पाटील

- प्रतापराव भोसले यांना वाहिली श्रद्धांजली  इंदापूर : प्रतिनिधी दि.19/5/24                  ज्येष्ठ नेते आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ आमचे मार्गदर्शक होते. प्रचंड बुद्धिमत्तेची देणगी लाभलेले हे व्यक्तिमत्व होते.  सध्याच्या संगणकीय युगात नव्या पिढीचा विश्वास बसणार नाही, एवढी अदभूत स्मरणशक्ती भाऊंजवळ होती. त्यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वाभिमानी व अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचे रत्न हरपले आहे, या शब्दात राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.            राज्याचे जेष्ठ नेते, सातारा मतदारसंघाचे 3 वेळा खासदार राहिलेले, वाई मतदार संघाचे 4 वेळा आमदार असलेले माजी मंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रतापराव भोसले (वय -90) यांचे वृद्धपकाळाने भुईंज निवासस्थानी रविवारी (दि.19) निधन झाले.  त्यांच्या निधनाने अनेक आठवणींना उजाळा देत हर्षवर्धन पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण केली.       ...

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

*जेबिव्हीपीतील बालचमुंचा पक्षी संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम* - *

 इंदापूर: - जय भवानी गड विकास प्रतिष्ठान मध्ये विद्यार्थ्यांनी पक्षांना होणारा त्रास व पक्षांप्रती असलेली भावना समजून प्रशालेतील विद्यार्थी रोज चिऊचा घास, काऊचा घास या उक्तीप्रमाणे रोज पक्षांना चारा पाणी देत होते.परंतु पक्षांना खाण्यासाठी पाण्यासाठी लागलेली आशेची निराशा होऊ नये म्हणून ज्याप्रमाणे मानव आपल्या उदरनिर्वाहासाठी कार्य करतो आपले पोट भरतो आपली तृष्णा भागवतो परंतु हेच पक्षांना आपली भावना व्यक्त करता येत नाही हीच भावना समजून ; 5 मे 2024 रोजी शालेय विद्यार्थ्यांचा चालू वर्षातील अखेरचा दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या लागणाऱ्या सुट्ट्यांमुळे आपल्या या कार्यात खंड पडू नये म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांच्या संकल्पनेतून या पक्षांची अन्नधान्याची, पाणी पिण्याची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी ट्विंकल देशमुखे  पूनम धांडोरे  ,ज्योती वाघमारे , प्रियंका यादव  यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम घरटे बनवण्यासाठी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी बॉटल नारळाचे करवंटी डबे इत्यादी साहित्याचा वापर करून अतिशय सुंदर कृत्रिम घरटे...