मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्यूज, शिवसृष्टी न्यूज

इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी ग्रामपंचायतीचा अजब कारभार,दलिताच्या घरावर जेसिबी फिरवूनही नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा प्रकार उघडकीस 
 इंदापूर  दलितांना विकासाचे गाजर दाखवून, बंदिस्त गटारीचे काम करताना दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून केलेल्या नुकसानीची भरपाई देण्यास टाळाटाळ केल्याचा धक्कादायक प्रकार तरंगवाडी (ता. इंदापूर ) येथील ग्रामपंचायतीमध्ये उघडकीस आला आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत तरंगवाडी ग्रामपंचायतीने दलित नागरिकांना विकासाचे गाजर दाखवून दलितांच्या सोईकरिता बंदिस्त गटारीचे काम मे.मिसाळ ठेकेदाराकरवी करण्यात आले.हे काम करत असताना संबंधित ग्रामपंचायतीने सिमेंटचे पाईप गाडत असताना आम्हाला रस्ता खोदायची परवानगी नाही असे तोंडी कारण देत दलिताच्या घरावर जेसिबी फिरवून संबंधित सिमेंट पाईप गाडण्यात आला. यादरम्यान संबंधित ग्रामसेवक, सरपंच तसेच ठेकेदार यांनी नुकसानग्रस्त कुटुंबाला तुमचे झालेले नुकसान आम्ही भरुन देवू असे तोंडी आश्वासन संबंधित कुटुंबाला दिले. आशी माहीती दिपकराव खिलारे यांनी दिली, 
मात्र या तोंडी आश्वासनानंतर संबंधित कुटुंबांनी नुकसानभरपाईची मागणी ग्रामपंचायत, ठेकेदार यांचे कडे केली असता संबंधित ग्रामसेवकाने मी तुम्हाला ओळखतही नाही, तर ठेकेदाराने सांगितले की, तुमचे बांधकाम हे अतिक्रमणात आहे. त्यामुळे आम्ही ते काढून टाकले आहे. तुम्हाला नुकसानभरपाई देण्याचा प्रश्नच येत नाही. अशी उडवाउडवीची दिली. 
परंतु दरम्यान नुकसानग्रस्त कुटुंबाने संबंधित ग्रामपंचायतीकडे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी याकरीता लेखी अर्ज दिला होता. 
मात्र या अर्जाकडे साफ दुर्लक्ष करुन गेल्या वर्षापासून या दलित नुकसानग्रस्त कुटुंबाला नुकसानभाईपासून वंचीत ठेवले.                                                                            
□□□□□□ चौकट □□□□□□□


वास्तविक पाहता तरंगवाडी येथील दलित नागरिकांची संख्या अवघी ३९ आहे. हे गाव अवर्षणग्रस्त गाव आहे.या गावामध्ये वेळोवेळी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. अश्या परिस्थितीमध्ये गावाला पिण्याला पाणी नाही. त्याठिकाणी गटार योजना राबविणे म्हणजे केवळ ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक तसेच ठेकेदार यांना जगण्याचा उद्योग आहे. असे म्हणण्यास वाव आहे.म्हणजे पिण्यास पाणी नाही. परंतु सांडपाणी वाहण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात येत आहे.आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? हा प्रश्न वास्तविक पाहता संबंधित विभागाला पडण्याची गरज आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते