मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

---------------------------------------------------------
इंदापूर:प्रतिनिधी दि.7/9/20
             इंदापुर तालुक्यात कोविड रुग्णांची संख्या 1150 पर्यंत पोहचली असून त्यामध्ये आजपर्यंत दुर्दैवाने झालेले 46 मृत्यू ही चिंतेची बाब आहे. राज्यात मृत्यूचा दर हा केवळ 2.5 ते 3 टक्केच्या आत असताना इंदापूर तालुक्यात मात्र कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर 4 टक्के एवढा जास्त का? असा सवाल भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सोमवारी (दि.7) उपस्थित केला.या झालेल्या मृत्यूमध्ये केवळ ऑक्सीजन,व्हेंटीलेटर न मिळाल्याने सुमारे 30 ते 32 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
               इंदापूर तालुक्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर हा जास्त असणे म्हणजे येथील लोकप्रतिनिधी असलेल्या मंत्र्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये अपयश आले आहे, हे स्पष्टपणे दिसून येते.चार महिन्यापूर्वी मी इंदापूर तालुका हा कोरोनाचा हॉट स्पॉट होईल, असा जाहीरपणे इशारा दिला होता व त्यानुसार शासनाने ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदी वैद्यकीय  सुविधांची उपलब्धता करावी, अशी मागणी केली होती. जर त्यानुसार नियोजन झाले असते तर आज रुग्णांच्या मृत्यूची संख्या वाढली नसती, असे हर्षवर्धन पाटील यांनी ठामपणे सांगितले. सध्याच्या लोकप्रतिनिधींना परिस्थितीचे  गांभीर्य नाही, जबाबदारीची जाणीव नाही, फक्त आश्वासने दिली जातात, असेही त्यांनी सांगितले.
                     इतर  तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधा आहेत, मंग इंदापूर तालुक्याला मंत्रीपद असूनही चांगल्या वैद्यकीय सुविधा का नाहीत. सध्या इंदापूर तालुक्यातील जनता ही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने भयभीत झाली आहे. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर बेडच्या आरोग्य सुविधा शासनाकडून मिळत नाहीत तसेच बाहेरच्या शहरातही रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही.त्यामुळे भयभीत झालेल्या जनतेला कोण दिलासा देणार? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. 
        ते पुढे म्हणाले,कोरोनाचा वाढता संसर्ग व मृत्यूचा दर रोखण्यासाठी इंदापूर तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाचे तातडीने सर्वेक्षण करण्यात यावे. त्यामुळे कोरोना बाधित व्यक्तींचे लवकर निदान करणे शक्य होईल व अशा बाधित रुग्णांकडून  होणारा संसर्ग रोखला जाईल.तसेच सर्वेक्षणात आढळून आलेल्या बाधित रुग्णांवरती तातडीने उपचार होऊन त्यांचा जीव वाचेल.
              इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले मंत्री हे कोविड रुग्णांवरती तातडीने उपचाराचे योग्य व्यवस्थापन करण्यामध्ये निष्क्रिय ठरत आहेत. इंदापूर तालुक्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह वैद्यकीय साधनांची तसेच डॉक्टर व स्टाफची टंचाई , रुग्णाच्या मृत्यूनंतर नातलगांना होणारा त्रास याकडे कोणाचेच लक्ष नाही. कोविड सेंटरमध्ये अद्यापी अनेक असुविधा आहेत.  लोकप्रतिनिधींनी बैठकांमध्ये घोषणा करण्याऐवजी कोरोना रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर आदी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे. जनतेने सध्या मिळणाऱ्या असुविधांचा मुद्दा कोठे मांडायचा ? आम्ही विरोधासाठी बोलत नाही तर वस्तुस्थिती मांडत आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.जनतेचा शासन, प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही, आता स्वतःचे व कुटुंबाचे कोरोना पासून संरक्षण हे स्वतःलाच करावे लागणार आहे, या मानसिकतेत जनता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
          पाटील पुढे म्हणाले, कमी वेळेत कोरोना बाधितापर्यंत पोहचून त्यांचे विलगीकरण  करणेकडे प्रशासकीय यंत्रणेने जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. जनतेने शक्यतो गर्दीत जाणे टाळावे, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करून व मास्क, सनीटायझरचा वापर करून कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे,असे आवाहनही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी केले.
________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते