मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

        इंदापूर :येथील दुधगंगा दुध उत्पादक सहकारी संघाला शासनाने अवसायनात ( दिवाळखोरीत) काढण्याची दिलेली नोटीस बेकायदेशीर व राजकीय हेतूने दिल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (दि.3) स्पष्टपणे नमूद करून सदरची नोटीस रद्द केली. यावेळी निकाल पत्रात मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित दुग्धविकास खात्याच्या मंत्र्याने नोटीस काढण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचा स्पष्टपणे उल्लेख करीत ताशेरे ओढले आहेत. दरम्यान, दूधगंगा संघाचे संकलन दररोज वाढत असून मंगळवार (दि.5) चे संकलन 42 हजार लिटर होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती संघाचे संस्थापक व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी इंदापूर येथे दुधगंगा दूध उत्पादक सहकारी संघाच्या कार्यालयात दिली. यावेळी त्यांनी न्यायालयाच्या निकालाची प्रत पत्रकारांना दिली.
       राज्य सरकारने तालुका पातळीवर कार्यरत असणाऱ्या दूधगंगा दूध संघा विरुद्ध उच्च न्यायालयात लढा देण्यासाठी महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल कुंभकर्णी यांची नेमणूक केली होती. न्यायालयाने त्यांना विचारले दूध संघ दिवाळखोरीत काढण्याची नोटीस कुठल्या कलमान्वये देता येते? दूधगंगा दूध संघाने कोणत्या कायद्याचे उल्लंघन केले आहे काय? दूध संघ चुकीचं वागले का? असल्यास पुरावे सादर करा. न्यायालयात दूधगंगा दूध संघाच्या वकिलांनी युक्तिवाद केला.
           निकालपत्रात उच्च न्यायालयाने सध्या कोविडचे संकट असताना व दुध जीवनावश्यक वस्तू असताना तसेच दूधगंगा दूध संघाने अमुल या जागतिक पातळीवरील ब्रँडची करार केलेला असताना शासनाने राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून दबावामुळे संघास आवसायनाची नोटीस दिल्याचे नमूद केले. मंत्रिपदाच्या अधिकाराचा  राज्यमंत्र्यांनी दुरुपयोग करीत राजकीय सूडबुद्धीने दिलेली नोटीस उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवण्याचा निर्णय दिला. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत करीत  हा निकाल ऐतिहासिक व क्रांतिकारक असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
           मी 20 वर्षे मंत्री होतो, मात्र विरोधकांच्या संस्थावरती कधीही जाणून-बुजून कारवाई केली नाही.न्यायालयाच्या निर्णयाने सत्याचा विजय झाला आहे. सत्ता बदलत असते याची जाणीव तालुक्याचे लोकप्रतिनिधी असणाऱ्या मंत्र्यांनी ठेवावी. दूधगंगा दूध संघ अवसायनात काढण्याची नोटीस देणे पाठीमागचा बोलवता धनी कोण आहे? याची माहिती जनतेला होणे आवश्यक आहे. राज्यमंत्र्यांनी तालुक्यात एखादी तरी सहकारी संस्था काढावी, इतरांच्या सहकारी संस्थांमध्ये अडथळे आणण्याचे काम करू नका, असा टोलाही यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लगावला.यावेळी यावेळी दुधगंगा दूध संघाचे अध्यक्ष मंगेश पाटील, उपाध्यक्ष उत्तम जाधव यांच्यासह इंदापूर तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक एस.के. कुलकर्णी यांनी दूध संघाच्या प्रगतीचा आढावा सादर केला.

राज्यमंत्र्यांवर ताशेरे गंभीर बाब !
      ---------------------------------------
कायदेशीर तरतुदीचा विचार न करता दुग्ध विकास विभागाने, सदर विभागाचे मंत्री हे हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय विरोधक असलेने, मंत्र्यांनी पदाचा दुरुपयोग करून राजकीय हेतूने दूधगंगा दूध संघावर आवसायनाच्या कारवाईची नोटीस दिली आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने निकालपत्रात नोंदवले आहे. सरकारच्या थेट राज्यमंत्र्यावर उच्च न्यायालयाने ताशेरे ओढणे ही बाब गंभीर मानली जात आहे. न्यायालयाच्या या निकालाचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
 _____________________________
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते