मुख्य सामग्रीवर वगळा

लक्ष्मी वैभव न्युज शिवसृष्टी न्युज

इंदापूर:भीमा नदीवरील भाटनिमगाव (ता.इंदापूर) कोल्हापूर पध्दतीचा बंधारा हा गेली काही वर्षांपासून नादुरुस्त असल्यामुळे सतत  पाण्याअभावी कोरडा पडत आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग अडचणीत आलेला आहे.तरी बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा कायम राहावा,यासाठी बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचेकडे केली आहे. 
       सदरची मागणी हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्राद्वारे आहे. उजनीच्या अगदी पायथ्याशी असलेल्या या बंधाऱ्यातून सध्या पाण्याची गळती मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे हा बंधारा कोरडा पडला आहे.या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे 1 कोटी 75 लाख रू.खर्चाचे अंदाजपत्रक आपल्या कार्यालयाकडे सादर करण्यात आलेले आहे,तरी दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात यावी,असे हर्षवर्धन पाटील यांनी सदर पत्रात नमूद केले आहे.
          सध्या या बंधाऱ्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होऊन पाणी वाहून जात असल्याने बंधा-यातील पाण्यावरती अवलंबून असणाऱ्या इंदापूर तालुक्यात बाभुळगाव, भाटनिमगाव, गलांडवाडी नं.2, वडापुरी, अवसरी, सुरवड, भांडगाव, बेडशिंगे आणि माढा तालुक्यातील रांझणी, आलेगाव,रूई या गावांमध्ये चारा व पिण्याच्या पाण्याची टंचाई  निर्माण झाली आहे,असे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
            सध्या भाटनिमगाव बंधाऱ्यामधील पाण्यावरती शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी तत्वावरील अनेक उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित आहेत.परंतु त्या पाण्याअभावी बंद पडल्या आहेत.त्यामुळे या बंधाऱ्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे.
युतीच्या शासनामध्ये बांधलेला बंधारा हर्षवर्धन  पाटील यांनी सांगितले की,युती  शासनामध्ये मी मंत्री असताना हा बंधारा बांधण्यात आला. सुमारे 21 वर्षे या बंधाऱ्याला झाल्यामुळे आता या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.मी मंत्रीपदावर असताना भीमा व नीरा नदीवरील बंधारे हे दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून नियोजनपूर्वक बांधले आहेत.त्याचा फायदा गेल्या अनेक वर्षापासून इंदापूर तालुक्यातील शेतीला होत आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केलेआहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कै.विष्णुपंत बाब्रस यांना आजी-माजी नेत्यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली, तर अजित पवार यांची संतवन पर भेट

इंदापूर :तालुक्यातील माजी नायब तहसीलदार कै.विष्णुपंत (भाऊसाहेब) बाब्रस यांचे नुकतेच दुःखद निधन झाले ते मा.नगरसेवक विनायक बाब्रस यांचे ते वडील होते,राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या खा.सुप्रियाताई सुळे,आमदार.दत्तात्रय भरणे भाजपची ज्येष्ठ नेते हर्षवर्धनजी पाटील  पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांनी बाब्रस कुटुंबीयांचे सांत्वन केले   त्यांच्या  आत्म्यास चिरशांती लाभो असे मत यावेळी अजित दादा पवार यांनी व्यक्त केले याप्रसंगी   मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस  मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस  अॅड विलास बाब्रस निखिल बाब्रस, अथर्व बाब्रस व शिवाजी इजगुडे सह इंदापूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाब्रस भाऊसाहेब यांनी त्यांच्या शासकीय सेवेतील३५वर्षातील कळात,यशस्वी कामगिरी केली, गोरगरीब जनतेचे प्रमाणीक पणे काम केले, अडलेल्या जनसामान्य जनतेला सहकार्य केले, सलाम त्यांच्या कार्याला आशा शब्दात, बाब्रस...

साऊ -- तुझ्यामुळे जगण्याला अर्थ आला...निलोफर रज्जाक पठाण

 इंदापूर:- (मा.प्रशांतदादा सिताफ यांचेकडून) आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अर्थातच सावित्रीच्या विचारधारांच्या उत्सवाच्या निमित्ताने शब्दसुमनांनी आदरांजली वाहताना मनात कृतज्ञतेचा भाव आहे कारण खऱ्या अर्थाने साऊ तुझ्यामुळेच आम्हा स्त्रियांच्या जगण्याला अर्थ आला आहे.         ज्योतीराव फुले यांच्या प्रेमळ सहवासात, निसर्गाच्या सानिध्यातील संसार,समाजकार्य आणि काव्य लेखन या तिहेरी भूमिका निभावणाऱ्या सावित्रीबाई म्हणजे सतत झुळझुळत राहणारा ऊर्जेचा निर्मळ झराच !त्या काळच्या निकशावर विचार करताना एका स्त्रीचे असे जगणे म्हणजे दिव्यच! साऊ चे योगदान भारताच्या इतिहासात एक अमूल्य ठेवा आहे. त्यांचे कार्य भारतातील स्त्री शिक्षण आणि स्त्री स्वातंत्र्य चळवळीसाठी प्रेरणादायी आहे.           सेवा करुणेचा एक अनोखा आदर्श, बालहत्या प्रतिबंधक गृह, सत्यशोधक विवाह ,गरीब मुलांचे संगोपन आणि ब्राह्मण विधवांच्या केशवपणाविरुद्ध नाभिकांचा संप घडविणे हे नेतृत्व सावित्रीचे ऐतिहासिक योगदान अधोरेखित करते.           खऱ्य...

*हिना शेख यांची मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने सन्मान - फिरोजखान पठाण*

इंदापूर:- आपल्या इंदापूर तालुक्यातील लुमेवाडी येथील बालिश कमरुद्दिन शेख यांची कन्या हिना बालिश शेख यांची मुबंई पोलीस पदी नियुक्ती झाली.. .हिना शेख ह्या लुमेवाडी गावातील प्रथम मुबंई पोलीस म्हूणन त्यांना मान प्राप्त झाला आहे... मुबंई पोलीस पदी निवड झाल्याद्दल त्यांच्या सत्कार टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.... यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे फिरोजखान पठाण समीर शेख जावीद शिकलकर सद्दाम सय्यद मिनाज शेख व लुमेवाडी गावातील मोईन शेख महबूब शेख रईस पठाण निहाल शेख साकिब शेख आतिक शेख उपस्थित होते