मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

समता इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये चिमुकल्यांचे स्वागत

वाल्हे प्रतिनिधी - सिकंदर नदाफ  नातेपुते ( ता. माळशिरस ) येथील समता शिक्षण संस्थेच्या,  समता इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५ - २६ चा पहिला दिवस उत्साही वातावरणात व नवागतांच्या स्वागताने पार पडला.  यावेळी सकाळपासूनच शिक्षक वर्ग शाळेच्या प्रवेशद्वारावरती विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास अतिशय उत्साही दिसत होते. चिमुकल्यांचा किलबिलाट या वातावरणात अजून रंग भरत होता.  शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष ॲड.श्री.भानुदास राऊत तसेच संस्थेचे सचिव कुमारी श्रद्धा राऊत तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ कविता लोंढे पर्यवेक्षिका  सौ सुनिता फुले आणि सर्व पालक वर्ग यांच्या हस्ते गुलाबपुष्प आणि खाऊ देऊन करण्यात आले. याप्रसंगी शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी सकाळपासूनच पालकांची ओढ लागली होती.  सदर स्वागत समारंभासाठी शाळेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक पर्यवेक्षिका आणि पालक वर्ग व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता.

आर.के.शहा विद्यालयाच्या वतीने मुलांचे गुलाब पुष्प , पाठ्यपुस्तके व फुगे वाटप करून त्यांचे स्वागत

इंदापूर:- शहर विकास प्रतिष्ठान संचलित,श्री .आर. के. शहा विद्यालय इंदापूर येथे आज नवीन शैक्षणिक वर्ष 2025/26 दिनांक 16/ 06/2025 रोजी नवीन प्रवेशितांचे संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुलांचे गुलाब पुष्प , पाठ्यपुस्तके व फुगे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. ॲड. गिरीश शहा साहेब तसेच श्री. ॲड. शरद घोगरे व श्री. ॲड. रंजीत चौधरी यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, शिक्षक ,विद्यार्थी व पालक हे उपस्थित होते.

कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील जुना पूल वाहून गेला

मुबंई प्रतिनिधी: श्री.सतिश वि.पाटील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, मदत आणि बचावकार्य सुरू पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुका रविवारी सुटटीचा दिवस असल्याने अनेक पर्यटकांनी या ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, दुपारच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील जुना पूल अचानक कोसळला आणि पुलावर उपस्थित असलेले पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बचाव आणि मदतकार्य सुरू केले. आता प्रशासकीय अधिकारी, स्थानिक पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. इंद्रायणी नदी पूल परिसरात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. पर्यटकांची मोठी गर्दी पुलावर होती. तर काही पर्यटकांनी दुचाकी नेल्याचं बोललं जात आहे. परिणामी ओव्हरलोड झाल्याने हा पूल कोसळला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत म्हटलं, "पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे...

शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री अजित पवार*

*उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन; आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराचे वितरण*  पुणे, दि.१४: बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला आधुनिकतेची जोड देण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करण्याची गरज आहे, शिक्षकांनी आपली जबाबदारी ओळखून नवीन पिढी घडविण्याकरीता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच गुणवत्ता वाढीसाठी पुरेपूर प्रयत्न करावे. राज्यात विविध प्रयोगशील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवित असून त्यांच्या उपक्रमाचे इतर शिक्षकांनीही अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.  पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने श्री गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन आणि उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आम...

*पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार*

पुणे दि. १४: आषाढी पालखी सोहळ्यादरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी; पालखी तळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोहळ्यासाठी शासनातर्फे आवश्यक निधी देण्यात येईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. विधान भवन पुणे येथे झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२५ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त डॉ.योगेश म्हसे, पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आदी उपस्थित होते. श्री.पवार म्हणाले, पावसाच्या पार्श्वभूमीवर विसाव्याच्या, मुक्कामाच्या ठिक...

*पुणे विभागातील कोविड-19 परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा*

पुणे दि . १४: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानभवन येथे आयोजित बैठकीत पुणे विभागातील कोविड-19 साथीच्या अनुषंगाने आढावा घेतला. लक्षणे सौम्य असली तरी वृद्ध तसेच सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून आरोग्य विभाग, महानगरपालिका तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. कंदेवाड यांनी कोविड-19 च्या अनुषंगाने सादरीकरण केले. सद्यस्थितीत तपासणीमध्ये ओमीक्रॉनचे जेएन, एक्सएफजी व जीएफ7-9 हे उपप्रकार आढळून येत आहेत. या प्रकारामुळे ताप, खोकला, घसा दुखणे असे सौम्य आजार होतात. फक्त रक्तशर्करा, कर्करोग आदी सहव्या...

स्व.मैथिली पाटील कुटुंबीयांचे ( पनवेल, न्हावा) महेंद्रशेठ घरत यांनी केले सांत्वन.

मुबंई प्रतिनीधी:  श्री.सतिश वि.पाटील  अहमदाबादमधील विमान अपघातात पनवेल तालुक्यातील न्हावा गावातील मैथिली मोरेश्वर पाटीलचा हिचा दुर्दैवी मृत्यू झाला... त्यामुळे न्हावा गावातील हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिच्या दु:खद निधनाने न्हावा गावावर शोककळा पसरली आहे... आज काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी मैथिलीच्या कुटुंबीयांची न्हावा येथे जाऊन भेट घेतली... न्हावा गावावर पसरलेली शोककळा पाहून महेंद्रशेठ घरत यांनाही तीव्र दुःख झाले... सांत्वन करताना ते म्हणाले, "गुरुवारी विमान अपघाताची घडलेली घटना अतिशय वेदनादायक आहे... न्हावा गावची कन्या या दुर्दैवी अपघात निधन झाल्याचे समजताच गावात स्मशानशांतता पसरलीय... मीसुद्धा ही घटना समजताच अस्वस्थ आणि दुःखी आहे... काॅंग्रेसचा एक पूर्वनियोजित कार्यक्रम ठरला होता, पण तो या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच रद्द केला आहे... जगभर मी प्रवास करतो, पण अशी घटना कधी घडली नाही... केंद्र सरकारने यांची गंभीर दखल घ्यावी. मैथिलीच्या कुटुंबीयांच्या मागे मी कायम आहे..." यावेळी न्हावा गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्य...